उष्मा घाताचा परिणाम शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी; पोल्ट्री व्यवसाय अडचणीत

शेती पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे पहिले जाते परंतु यंदाची उष्णतेची दाहकता अधिक असल्याने त्याचा माणसांप्रमाणे मुक्या पशु, पक्षांवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे

0
1436

पालघर -योगेश चांदेकर

पालघर – गेल्या आठ दिवसांपासून, विक्रमगड तालुक्यात वाढलेल्या कडक उन्हाच्या पा-याने माणसांप्रमाणे मुक्या पशु, पक्षांनाही हैराण केले आहे. या अति उष्णतेमुळे विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील दोन पोल्ट्री फार्ममधील शुक्रवारी साडेसातशेहुन अधिक कोंबड्या मरण पावल्या आहेत.
येथील उष्णतेचा पारा 42 अंशावर गेल्यामुळे या कडक उन्हामुळे लहान मुलांच्या आजारातही वाढ झाली आहे. तर पोल्ट्री व्यवसायकांच्या पोल्ट्रीत कोंबड्यांचे मरणाचे प्रमाण खुपच वाढले आहे. विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे येथील मिलिंद गायकवाड यांच्या पोल्ट्रीत शुक्रवारी एकाच दिवशी सरासरी पावणे दोन ते दोन किलो वजनाच्या 672 कोंबड्या मरण पावल्या. याच पोल्ट्री शेजारी असलेल्या भरत शेलार यांच्या पोल्ट्रीतील दिड किलो वजनाच्या 237 कोंबड्या मरण पावल्या.


शुक्रवारी विद्युत वितरण कंपनीने संपूर्ण दिवस विद्युत पुरवठा खंडित केला होता. विद्युत पुरवठा नसल्याने उष्णता कमी करण्यासाठी पोल्ट्रीत लावलेले पंखे बंद राहिल्याने व या पक्षांना थंडावा निर्माण करण्यासाठी विजेअभावी पाण्याचा फवाराही (फोगर) मारता न आल्यामुळे हे पक्षी अधिक प्रमाणात मरण पावले असे मिलिंद गायकवाड यांनी सांगितले.
मिलिंद गायकवाड व भरत शेलार या दोन्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरु केला असुन एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षी मेल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान कसे भरपाई करणार या विवंचनेत ते अडकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here