पालघर – योगेश चांदेकर:
राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्हयातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. ही बाब विचारात घेता राज्य सरकारने शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होमची सवलत दिली आहे. तथापि शाळा सुरू करणेची तयारी व ई-लर्निंग बाबत मुख्याध्यापकांनी आठवडयातून दोन दिवस बोलविल्यास शिक्षकांनी उपस्थित रहावे असा आदेश २४ जून रोजी परिपत्रक काढत शासनाने दिला आहे. असे असताना पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना याबाबत काहीही कळवले नाही तसेच त्याबाबतचा कोणताही आदेश काढलेला नाही. यामुळे पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्यात संभ्रमावस्था असून अनेक शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार मधुमेह, श्वसन विकार, रक्त दाब, हृदयविकार इत्यादी सारखे गंभीर आजार असलेले व ५५ वर्षावरील शिक्षक तसेच महिला शिक्षिका यांना शाळेमध्ये न बोलावता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्याची सूचना केली आहे. यापैकी ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती अत्यावश्यक असेल अशा शिक्षकांना शाळेमध्ये बोलविण्याबाबत संबंधित मुख्याध्यापकांनी / शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावा. अशा शिक्षकांना शक्यतो आठवडयामध्ये एक किंवा दोन दिवसापेक्षा जास्त वेळा बोलवू नये तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये असे देखील सूचित करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी असा कोणताही सूचना/आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक कडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे जवळजवळ सर्वच शिक्षकांना शाळेत जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या सर्व शिक्षकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धास्ती निर्माण झाली आहे. सर्वांना शाळेत यावे लागत असल्याने समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या या मनमानी कारभारामुळे अनेकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पालघर जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. उशिरा का होईना याबाबत काय आदेश निघणार का? यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई ई न्यूज वेब टीम: वाचकहो आम्ही आपल्यासाठी बातम्यांसोबतच इतर महत्वपूर्ण दर्जेदार माहिती घेऊन येत असतो. 'आजीबाईचा बटवा' (aajibaicha batava)… Read More
डहाणू प्रतिनिधी - विनायक पवार: डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेती/वरोती ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी पेसाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार… Read More
जव्हार प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपाबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने गट… Read More
डहाणू प्रतिनिधी : जितेंद्र पाटील - डहाणू तालुक्यात एका विद्यार्थ्यांचा गंजाड मणिपूर येथील खदानी मध्ये पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची… Read More
तलासरी प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत कृषी पतपुरवठा मतदार… Read More
पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने असलेल्या कासा-भराड सूर्या कालव्यामध्ये कल्लू ढाबा येथून वाहणाऱ्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत… Read More