मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाने मृत झालेल्यांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये, अधिकाधिक नागरिक बाधित होऊ नयेत, संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलच्या रात्रीपर्यंत असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) रात्री ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, आस्थापना, प्रवासी वाहतूक बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
- पुढचे पंधरा दिवस राज्यात १४४ कलम लागू !
- कोणत्याही व्यक्तीस योग्य कारण नसल्यास घराबाहेर पडण्यास परवानगी नाही
- सकाळी सात ते रात्री आठ ह्या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु
- राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु (केवळ अत्यावश्यक सेवेसाठी)
- हॉटेल्स बंद मात्र पार्सल सेवा सुरु
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुरू राहणार
- परवानाधराक रिक्षाचालकांनाही 1500रुपये देणार
- अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार
- नोदणीकृत घरकामगारांनाही निधी देणार
- रोजी थांबेल पण सरकार रोटी थांबू देणार नाही.
- शिवभोजन थाळी