पालघर – योगेश चांदेकर:
सरकारने कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये यासाठी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. पालघर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात ३१ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तातडीची उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता खासगी वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. आदेश देऊनही लोक रस्त्यावर येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन जप्तीचे आदेश दिले होते.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वाहने सोडून विनाकारण रस्त्यावर फिरणारे वाहनचालक यांचेवर 120 गुन्हे दाखल करून 498 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. तरी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.